नाव-सातबारा शेतकऱ्याचा; पैसा जातोय केंद्र चालकांच्या खात्यात

राज्य शासनाने एक रुपयात ‘पीक विम्याची घोषणा केली. परंतु अनेक सीएससी केंद्र चालकांनी ‘परस्परच अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा भरून विम्याची रक्‍कम आपल्या बँक खात्यात वळती करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी चार केंद्र सध्या निष्पन्न झाली आहेत.

मागील आठवड्यात दोन वेळेस अतिवृष्टी झाली. अद्याप ती नुकसान भरपाई मिळाली नाही. दुबार पेरणीचे संकट असताना आता पीक विमा भरणा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना गंडविण्याचा प्रकार समोर आला आहे. पीक विमा भरण्याची मुदत संपल्यानंतरही जवळपास 50 हजारांवर शेतकरी विमा भरुच शकले नाहीत. हजारो शेतकऱ्यांच्या नावाने केंद्र चालकांनीच त्यांचा सातबारा आणि इतर कागदपत्रांचा वापर करुन एक रुपयाच्या शुल्काद्वारे विमा भरला.

चार केंद्रावर प्रकार उघडकीस, अस्मानीने मारले अन्‌ सुलतानीने लुबाडले

” शेतकऱयांच्या नावे परस्पर पीक विमा भरणारी जिल्ह्यातील चार केंद्र निष्पल झाली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विमा कंपनीला कळविण्यात आले आहे.”- जिल्हा कृषी अधीक्षक

बँक खाते क्रमांक आपले किंवा नातेवाडकांचे टाकले, त्यामुळे या शेतकयांच्या नावे पीक विमा आला तरी, तो थेट केंद्र चालक किंवा त्यांच्या नातेवाडकांच्या खात्यात जमा होणार आहे. या ऑनलाइन लुटीबाबत शेतकरी मात्र अनभिज्ञ आहेत.

३० हजारांवर शेतकर्‍यांच्या तक्रारी

पीक विमा कंपनीकडे जवळपास ३० हजारांवर शेतकऱयांनी तक्रारी केल्याची माहिती आहे. यावरून जिल्ह्यातील अनेक सीएससी केंद्र चालकांनी अशाच प्रकारे
बोगसपणा केल्याचे दीसुन येते.

कंधार शहरातील एका केंद्र  चालकाला केवळ दीड एकर शेती आहे. या केंद्रावर जवळपास ६०० शेतकयांचा पीक विमा काढण्यात
आला. त्यातील १६० शेतकऱयांचा विमा या केंद्र चालकाने परस्पर काढला असून तशी कबुलीही त्याने दिली.

म्हणून शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे कि त्यांनी स्वतःच पीक विमा काढावा आणि आपला पीक विमा केंद्र किंवा परस्पर कोणी काढला आहे कि नाही हे तपासून पाहावे.

शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ऍप : पीक नोंदणी झाली सोपी

Leave a Comment